ग्राम पंचायतींना प्लास्टिकमुक्त करणार – जयकुमार गोरे
महाआवास योजनेचे पुरस्कार वितरण
पुणे, दि. २१ जून: ग्रामपंचायतींनी स्वच्छ, सुंदर आणि प्लास्टिकमुक्त महाराष्ट्रासाठी पुढे यावे आणि लवकरच राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध ग्राम स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी केले. (gramvikas samruddha gram spardha 2025)
रस्त्यावरील माईलस्टोन चे रंग काय सांगतात? – जाणून घ्या रस्त्यांच्या प्रकारांची ओळख
त्यांच्या हस्ते पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात निर्मल वारीचा शुभारंभ आणि महाआवास योजना व संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अप्पर आयुक्त नितीन माने आदी मान्यवर उपस्थित होते.
पुण्यात जाहिरात फलकांसाठी बेकायदा वीजजोड ; महापालिकेच्या तपासणीत फक्त ८७ प्रकरणे उघड
मंत्री गोरे यांनी सांगितले की, पंढरपूरच्या वारीसाठी सरकारने पुरेशा सोयी सुविधा केल्या आहेत. ७ लाख रेनकोट, फिरते दवाखाने, महिला स्नानगृह, औषधोपचार किट्स, तसेच यावर्षीपासून वृद्ध वारकऱ्यांसाठी मसाज सुविधा देण्यात आली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, “सर्वांसाठी घरे” या योजनेत ३० लाख घरे मंजूर करण्यात आली असून ६५ हजार कोटींचा निधी मंजूर झालेला आहे.
पुरस्कार विजेते ग्रामपंचायती व जिल्हे
- महाआवास योजना : पुणे जिल्हा – उत्कृष्ट कामगिरी
- स्वच्छ ग्राम स्पर्धा : शेळकेवाडी (कोल्हापूर) – प्रथम क्रमांक
- संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान विशेष पुरस्कार:
- स्व. वसंतराव नाईक पुरस्कार – दरेवाडी (सातारा)
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार – सांडगेवाडी (सांगली)
- स्व. आबासाहेब खेडकर पुरस्कार – गोयेगाव (सोलापूर)
पुणे जिल्ह्याचे विशेष पुरस्कार विजेते
- चिंचोली (जुन्नर)
- टाकवे खु. (मावळ)
- मांजरवाडी (जुन्नर)
कार्यक्रमात निर्मल दिंडी, आरोग्याची वारी, टॉयलेट ॲप, वारी माहिती पुस्तिका, मोबाईल व्हॅन, संवाद वारी आदींचा शुभारंभ करण्यात आला.
डॉ. पुलकुंडवार यांनी सांगितले: पंचायत राज व्यवस्थेचा उद्देश हाच की गावं स्वयंपूर्ण व्हावीत. ग्रामगीतेत मांडलेले मूल्य, पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेचा वारसा यासाठी सर्वांनी योगदान द्यावे.