पुणे जिल्ह्यातील धोकादायक पूल काढून टाका
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचा आदेश
इंद्रायणी कुंडमळा पूल दुर्घटना
पुणे : कुंडमळा (तळेगाव) येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याच्या दुर्घटनेची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जिल्ह्यातील सर्व जुन्या, जीर्ण व धोकादायक पुलांबाबत कठोर पावले उचलली आहेत. पूल केवळ दुरुस्त न करता पूर्णतः काढून टाकण्याचे आदेश त्यांनी जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. (pune dangerous bridge collapse order district collector dudi)
structural audit 2025। पुण्यातील पूल आणि जुन्या बांधकामांचे स्ट्रक्चरल ऑडीट होणार
या दुर्घटनेपूर्वीच जिल्हाधिकारी डुडी यांनी जिल्ह्यातील सर्व जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचे आदेश दिले होते. संबंधित विभागांनी काही ठिकाणी बॅरिकेटिंग केले होते, परंतु एकत्रित अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.जिल्ह्यात अजून किती पूल धोकादायक आहेत, याची प्रशासनाकडे माहिती नाही.
इंद्रायणी कुंडमळा पूल दुर्घटना
मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे रविवारी इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याने चार जणांचा मृत्यू झाला व ५१ जण नदीत पडले. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या तत्परतेमुळे अनेकांचे जीव वाचवले गेले. या पुलावर “धोकादायक पूल” असा फलक लावलेला होता व बॅरिकेटिंगही करण्यात आले होते. मात्र पर्यटकांनी गर्दी केल्याने पूल कोसळला.
शिक्षणाचा बाजार ! पुण्यात मान्यता नसलेल्या 13 शाळांचा पर्दाफाश
चौकशी समितीची स्थापना
अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. समितीत वन विभाग, पिंपरी-चिंचवड पोलीस उपायुक्त, सार्वजनिक बांधकाम व पाटबंधारे विभागाचे अभियंते आणि निवासी जिल्हाधिकारी यांचा समावेश आहे. अहवाल १५ दिवसांत सादर करण्यात येणार असून संबंधितांवर कारवाई होणार आहे. भविष्यातील अशा घटनांपासून बचावासाठी एसओपीतही सुधारणा केली जाणार आहे.
साकव पूल कोणाचा?
कोसळलेला पूल जिल्हा परिषदचा की सार्वजनिक बांधकाम विभागाचा, याबाबत प्रशासनात तू-तू, मै-मै सुरू आहे. चौकशी अहवालानंतर जबाबदारी निश्चित होणार आहे.