शेतीला कृषी पर्यटनाची जोड; शेतकऱ्यांना समृद्धीची नवी दिशा
महाराष्ट्र कृषी पर्यटन परिसंवाद २०२५ : अभिनेते मिलिंद शिंदे यांचे प्रतिपादन
पुणे | अवकाळी पाऊस, बदलते हवामान, शासनाच्या बदलत्या धोरणांमुळे शेती व्यवसाय दिवसेंदिवस अनिश्चित होत चालला आहे. अशा परिस्थितीत कृषी पर्यटन हा पर्याय शेतकऱ्यांसाठी नवा दिलासा ठरू शकतो, असे मत प्रसिद्ध अभिनेते मिलिंद शिंदे यांनी व्यक्त केले. परभन्ना फाउंडेशन, कृषी पर्यटन विश्व आणि धोंडू बाजी चव्हाण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित परिसंवादात ते बोलत होते. कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पटवर्धन सभागृहात करण्यात आले होते. परभन्ना फाउंडेशनचे गणेश चप्पलवार, मनीषा उगले, पंकज चव्हाण, व्यंकटेश कल्याणकर, सारंग मोकाटे, असीम त्रिभुवन, सूर्यकांत पोतुलवार, अजित मांदळे, महेश गोरे, महेश चप्पलवार आणि सुप्रिया थोरात यांचीही उपस्थिती होती. (krushi tourism maharashtra 2025)
नांदेडकरांसाठी आनंदाची बातमी : वंदे भारत एक्सप्रेस थेट नांदेड ते मुंबई धावणार !
शासनाच्या धोरणांबाबत चर्चासत्र
“शासकीय धोरणे आणि कृषी पर्यटनाचा विकास” या विषयावर परिसंवादात विविध मान्यवरांनी विचार मांडले. यामध्ये डॉ. मीनाक्षी पाटील (सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ), जिल्हा पर्यटन अधिकारी अजिंक्य लुगडे, कृषिराज पिलाणे (मुलुख फार्म्स) आदींचा सहभाग होता.
कृषी पर्यटन उद्योजकांचा गौरव
कार्यक्रमात वल्लरी प्रकाशन प्रकाशित आणि गणेश चप्पलवार लिखित ‘कृषी पर्यटन उद्योजकांची यशोगाथा’ या पुस्तकाच्या दुसऱ्या भागाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी ‘उद्योजकता पुरस्कार २०२५’ चे वितरण करण्यात आले. सन्मानित झालेल्या उद्योजकांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. सुरेश जनाबाई गोविंदराव मराठे , मंगल रमेश भिंगारे, अजय मिठारे, कृषिभूषण बन्सी तांबे,डॉ. अमोल पुंडे ,अनिल मगर (चित्री अॅडव्हेंचर इको अँड ऍग्री टुरिझम), राजेश्री सुतार (पन्हाळा प्राईड ऍग्री टुरिझम), मानसिंगराव वसंतराव जगदाळे, युवराज सांडभोर, सरस्वती कनिफनाथ हेंद्रे आणि धनश्री हेमंत गायकवाड यांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुनील धनगर यांनी केले तर आभार प्रदर्शन पंकज चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात माया कल्याणकर यांच्या पसायदान गायनाने झाली.