चोंडी (ता. मुखेड, जि. नांदेड) – राजमाता महाराणी अहिल्याबाई होळकर (Rajmata Ahilyabai Holkar) यांची 300 वी जयंती चोंडी गावात मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक भक्तिभावाने साजरी करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून या महान राष्ट्रमातेचे स्मरण करण्यात आले. (300th birth anniversary of Rajmata Ahilyabai Holkar celebrated with enthusiasm)
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी सुनील टिंगरे आणि सुभाष जगताप यांची नियुक्ती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भगवानराव पाटील आलेगावकर (Bhagwanrao Patil Alegaonkar) होते. प्रमुख अतिथी म्हणून नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार रविंद्र वसंतराव चव्हाण (MP Ravindra Vasantrao Chavan) यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाची सुरुवात अहिल्याबाई होळकर यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. त्यानंतर खासदार चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवकुमार देवकाते यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात भगवानराव पाटील आलेगावकर यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या दूरदृष्टी, सामाजिक कार्य आणि जनहितार्थ घेतलेल्या निर्णयांचा उजाळा दिला. यानंतर खासदार रविंद्र चव्हाण यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, “अहिल्याबाईंचे जन्मगाव नगर जिल्ह्यातील चोंडी आहे आणि योगायोगाने माझ्या मतदारसंघातही एक चोंडी गाव आहे. या दोन्ही गावांमध्ये ही जयंती उत्साहात साजरी होत असल्याचा मला आनंद आहे.”
कार्यक्रमास विविध सामाजिक आणि विचारधारेशी जोडलेले मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रा. डी. बी. जांभरुणकर, सुभाष गायकवाड, डॉ. हिमगीरे, चंद्रकांत घाटे, माधवराव पाटील उंद्रीकर, व्यंकटराव गायकवाड सर, बालाजी पाटील बेटमोगरेकर, पप्पू पाटील पाळेकर, श्रीनिवास पाटील पाळेकर, तानाजी हेळगीरे आदींचा समावेश होता. गावातील सर्व नागरिकांच्या सहकार्याने आणि एकत्रित सहभागाने हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडला.