पुणे : लोकप्रतिनिधी म्हणजे केवळ पद नव्हे, तर जनतेच्या विश्वासाची मोठी जबाबदारी असते. नागरिकांचे प्रश्न समजून घेणे, त्यावर ठोस उपाययोजना करणे आणि लोकांशी थेट संवाद साधणे, हीच लोकप्रतिनिधीकडून अपेक्षा असते. मात्र जेव्हा लोकप्रतिनिधी उच्च शिक्षित, आधुनिक दृष्टिकोन असलेला आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करणारा असतो, तेव्हा विकासाची दिशा अधिक परिणामकारक ठरते. परदेशातून उच्च शिक्षण घेऊन पुण्यात सक्रिय समाजकारणातून राजकारणात उतरलेले सनी विनायक निम्हण हे याचे उत्तम उदाहरण आहेत.
कल्पक विचार, स्पष्ट धोरण आणि लोकांचा सक्रिय सहभाग या त्रिसूत्रीवर विश्वास ठेवत सनी निम्हण कार्यरत आहेत. लोकांच्या सहभागातूनच आदर्श प्रभाग आणि सक्षम समाज घडू शकतो, ही त्यांची ठाम भूमिका असून, त्याच विचारधारेतून त्यांची राजकीय वाटचाल सुरू आहे. पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम करताना सनी निम्हण यांनी Policy, Planning आणि Public Participation (3P) या संकल्पनेवर आधारित कार्यपद्धती प्रभावीपणे राबवली. याचाच भाग म्हणून त्यांनी ‘Solve with Sunny’ या अभिनव उपक्रमाअंतर्गत ‘विकासासाठी सूचना देऊया – सगळे मिळून आदर्श प्रभाग घडवूया’ हा लोकाभिमुख उपक्रम सुरू केला आहे.
या उपक्रमाला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून, प्रभागात आठ ठिकाणी सूचना केंद्र उभारण्यात आली होती. शेकडो नागरिकांनी QR कोड स्कॅन करून Google Form भरत आपल्या सूचना, अपेक्षा व तक्रारी नोंदवल्या. अनेक नागरिकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहूनही आपल्या समस्या मांडल्या.
या सर्व सूचनांचा सखोल अभ्यास करून त्या आगामी वचननाम्यात समाविष्ट केल्या जाणार असून, पुढे हाच वचननामा प्रत्यक्षात विकासनामा ठरेल, असा विश्वास सनी निम्हण यांनी व्यक्त केला. या उपक्रमासाठी सनी निम्हण स्वतः प्रभागातील सोसायट्या व वस्ती विभागांमध्ये जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत.
माजी आमदार विनायक निम्हण यांचा समृद्ध राजकीय व सामाजिक वारसा सनी निम्हण यांना लाभला आहे. त्या वारशाला आधुनिक शिक्षण, आंतरराष्ट्रीय अनुभव आणि नव्या विचारांची जोड देत त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. राजकारणासोबतच समाजकारणातही त्यांचा सक्रिय सहभाग कायम आहे.
माजी नगरसेवक असलेले सनी निम्हण हे पुन्हा एकदा औंध–बोपोडी प्रभाग क्रमांक ८ मधून भारतीय जनता पक्ष व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) यांच्या संयुक्त वतीने निवडणूक रिंगणात उतरले आहेत. लोकसहभाग, पारदर्शक प्रशासन आणि शाश्वत विकास या तीन आधारस्तंभांवर प्रभागाचा सर्वांगीण विकास घडवण्याचा त्यांचा ठाम निर्धार आहे.

