...

साहित्य, समाज आणि संस्कृतीसाठी डॉ. सबनीस यांचे योगदान अमूल्य – शरद पवार  

अमृतमहोत्सवी गौरव समारंभ

पुणे – साहित्यिक, विचारवंत आणि समाजप्रबोधन करणारे डॉ. श्रीपाल सबनीस यांचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरले आहे. “नव्या पिढीला घडविण्याचे काम त्यांनी प्राध्यापक, कवी, लेखक आणि संपादक म्हणून केले,” असे गौरवोद्गार ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काढले. (shripal sabnis amrut mahotsav sharad pawar speech)

 

रस्त्यावरील माईलस्टोन चे रंग काय सांगतात? – जाणून घ्या रस्त्यांच्या प्रकारांची ओळख

 

महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा, पुणे यांच्या वतीने टिळक स्मारक मंदिर येथे आयोजित अमृतमहोत्सवी गौरव समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमात माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, ललिता सबनीस, सचिन इटकर, चंद्रकांत दळवी, रवींद्र डोमाळे, भाऊसाहेब जाधव यांची उपस्थिती होती.

 

पवार म्हणाले, “सबनीस यांच्या लेखनात सामान्य माणसाचे दुःख, दिशाहीनता यांचे प्रगटीकरण आहे. त्यांनी साहित्य परिषदेचे अध्यक्ष म्हणून राज्यभर दौरे करून परिषदेचे बळ वाढवले.”

 

पुण्यात जाहिरात फलकांसाठी बेकायदा वीजजोड ; महापालिकेच्या तपासणीत फक्त ८७ प्रकरणे उघड  

 

शिंदे म्हणाले, “सबनीस हे विचारवंत असून, ते बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घेऊन काम करत आहेत. त्यांचे कार्य आजच्या समाजाला दिशा देणारे आहे.”

 

डॉ. श्रीपाल सबनीस यांनी आपल्या भाषणात म्हटले, “धर्म आक्रमक झाला की तो अशुद्ध होतो. सत्तेला नैतिकतेचे अधिष्ठान असले पाहिजे. मी मानवजातीचा वारसदार आहे.”

 

कार्यक्रमात ते भावनाविवश झाले. “आजच्या दिवशी दोन दिग्गज माझ्या समारंभात आहेत. मला हे आयुष्य धन्य वाटते. मी विश्वशांती आणि मानवतेसाठी काम करणार,” असे त्यांनी सांगितले.

 

खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले, “श्रीपाल सर हे धाराशिव जिल्ह्याचे भूषण आहेत. त्यांच्या विचारांचा महाराष्ट्राला लाभ व्हावा.” कार्यक्रमाचे आभार विराज तावरे यांनी मानले.

Local ad 1