...

व्हिडिओ : दिव्यांग फूड डिलिव्हरी बॉय आरबाज शेख बनला ‘वारकरी’

सायकलवरून पाणी वाटप करत दिली सेवाभावाची प्रेरणा

पुणे : संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखींच्या स्वागतासाठी पुणे शहर भक्तिभावात रंगून गेले आहे. जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता आणि संपूर्ण डेक्कन परिसरात हजारो भाविक व वारकरी दाखल झाले आहेत. टाळ, मृदंग, अभंग आणि “रामकृष्ण हरी“च्या गजरात वातावरण पावन झालेले असतानाच, एक प्रसंग सर्व पुणेकरांचे लक्ष वेधून घेत होता.

 

 

 

दोन पायांनी दिव्यांग असलेले आणि फूड डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारे बिबवेवाडीतील आरबाज शेख हे आपल्या इलेक्ट्रिक सायकलवरून जंगली महाराज रस्त्यावर आला आणि त्यांनी स्वतःखर्चाने आणलेले पाण्याचे बॉक्स वारकऱ्यांना वाटू लागला. भक्तिभावाने भरलेली त्यांची ही सेवा पाहून अनेक वारकरी आणि पुणेकर भारावून गेले.

 

 

 

🙏 सेवा हाच धर्म!

आरबाज शेख गेल्या काही महिन्यांपासून डेक्कन व सदाशिव पेठ परिसरात फूड डिलिव्हरीचे काम करतो आहे. ते बॉस्केटबॉल खेळाडू ही  आहे. त्यांने पुणे जिल्ह्याच्या संघाकडूनही खेळला आहे. पण शरीराने अपंग असूनही, त्यांच्या सेवाभावाने अनेकांना स्फूर्ती दिली. शुक्रवारी सांयकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ते आपल्या सायकलवरून छत्रपती संभाजी महाराज उद्यानाजवळ थांबलेल्या, थकलेल्या वारकऱ्यांना पाण्याच्या बाटल्या वाटत होता. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा नव्हता, तर समाधान आणि आनंद स्पष्ट दिसत होता.

 

 

🗣️ आरबाज यांच्याशी संवाद साधला असता, तो म्हणाला, “मी फूड डिलिव्हरी चे काम करतो. पण वारीत हजारो वारकरी सहभागी होतात, त्यांची सेवा करणं हे खूप समाधान देणारं आहे. त्यांना पाण्याची गरज वाटत होती, म्हणून मी स्वतःहून बाटल्या घेऊन वाटप करायला सुरुवात केली.” अनेक भाविकांनी त्याला पैसे, खाऊ किंवा आभार स्वरूपात काहीतरी देण्याचा प्रयत्न केला. पण त्याने नम्रतेने नकार दिला. तो म्हणाला, “मी तुमची सेवा करण्यासाठी आलो आहे, काही घेण्यासाठी नाही.”

 

पुणेकरांनी केले कौतुक, व्हायरल झाले फोटो

आरबाज शेखचे पाणी वाटप करतानाचे फोटो अनेक पुणेकरांनी सोशल मीडियावर शेअर केले. “हा खरा सेवाभाव आहे”, “वास्तविक देव इथं दिसतो” अशा प्रतिक्रिया मिळाल्या. पुण्यातील याच समाजसेवक वृत्तीमुळे वारीचा उत्सव अजूनच अर्थपूर्ण ठरतो.

 

✅ आरबाज शेखसारख्यांकडून समाजाला संदेश

दिव्यांगत्व असूनही आरबाज शेख यांनी केलेले कार्य हे आजच्या समाजाला नवा दृष्टिकोन देते. सेवा करायची जिद्द आणि इच्छाशक्ती असेल, तर काहीही अशक्य नाही. त्यांच्या या कृतीतून “समाजासाठी आपण काय करू शकतो?” याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे.

 

 

 

 

Local ad 1