पुणे : रवी भिसे यांच्या “माझा निषेध झाला पाहिजे” या काव्य संग्रहास नांदेडचा “कै.केवळबाई मिरेवाड” पुरस्कार जाहीर झाला. महाराष्ट्रभरातून आलेल्या 80 काव्य संग्रहातून रवी भिसे यांच्या “माझा निषेध झाला पाहिजे” (maza nished zala pahije) या काव्य संग्रहाची (Poetry collection) निवड झाली आहे.(Award for poetry collection by Ravi Bhise)
“कविता जगण्याचं भान देते, आणि कल्पनेच्या पलीकडचा विचार मांडून वाचकांना विचार करण्यास भाग पाडते. “माझा निषेध झाला पाहिजे”, यात असंच काहीतरी मांडण्याचा प्रयत्न केला आहे, पहिल्याच कवितासंग्रहाला मिळालेल्या या पुरस्कारामुळे खूप आनंदी आहे. आपण गांभीर्याने काही तरी लिहू पाहतो आणि वाचक त्याची दखल घेतात, तेव्हा खूप बरं वाटतं, या पुढे ही माणसाच्या जगण्याला वैचारिक हातभार लागेल असेच लिहीत राहीन.– रवी भिसे, कवी
या पुरस्काराचे संयोजक विरभद्र मिरेवाड तर साहित्यिक अशोक कोळी यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. (Award for poetry collection by Ravi Bhise)
काव्य संग्रहाबद्दल सबनीस म्हणतात, “हजारो कवी आहेत पण, स्वतःच्या मनाचे व व्यक्तित्वाचे चरित्र व चारित्र्य मानवी मूल्यांच्या निकषावर परखडपणे तपासून, स्वतःचा धिक्कार करणारी कविता मी फक्त रवी भिसे यांच्याच संदर्भात अनुभवली.”