महिला साक्षरतेतील चिंताजनक दरी: PLFS अहवाल देशातील वास्तव समोर
PLFS 2023-24 अहवालातील माहितील धक्कादायक माहिती
MH TIMES SPECIAL STORY । देशात शिक्षणाच्या दिशेने धोरणात्मक पावले उचलली जात असताना, एकंदर साक्षरतेचा दर समाधानकारक वाटतो. मात्र महिला साक्षरता अजूनही अपेक्षित पातळीपर्यंत पोहोचलेली नाही, ही चिंतेची बाब आहे. केंद्र सरकारच्या Periodic Labour Force Survey (PLFS) 2023-24 च्या अहवालानुसार, देशातील सात वर्षे व त्यावरील लोकसंख्येमध्ये पुरुषांचा साक्षरता दर ८२.२% इतका आहे, तर साक्षरता दर केवळ ६४.६% असल्याचे स्पष्ट झाले आहे. (bharat mahila saksharta gap plfs 2023-24)
विकासकांसाठी आनंदाची बातमी; NA आणि माइनिंग परवानगी ऑनलाईन होणार!
लिंग साक्षरतेतील दरी – १७.६%
ही आकडेवारी स्पष्टपणे दर्शवते की महिला साक्षरता वाढवण्यासाठी अजूनही प्रभावी पावले उचलण्याची गरज आहे. देशात शैक्षणिक सुविधा वाढल्या असल्या, तरी त्या महिलांपर्यंत पुरेशा प्रमाणात पोहोचलेल्या नाहीत.
राष्ट्रवादीच्या दोन गटांचा पुण्यात शक्तिप्रदर्शन ; कार्यकर्त्यांचे लक्ष एकवटले !
ग्रामीण आणि शहरी भागातील स्पष्ट तफावत:
PLFS च्या अहवालात महिला साक्षरता ही शहरी व ग्रामीण भागात कशी वेगळी आहे, याचे स्पष्ट चित्र समोर आले आहे.
शहरी भागात दर
पुरुष : ८७.३%
महिला : ७६.८%
तफावत : १०.५%
ग्रामीण भागात
पुरुष : ७८.८%
महिला : ५८.५%
तफावत : २०.३%
ही आकडेवारी दाखवते की ग्रामीण महिला साक्षरता अतिशय कमी असून, त्या पुरुषांच्या तुलनेत खूप मागे आहेत.
राज्यनिहाय असमानता कायम
काही राज्यांनी महिला साक्षरता वाढवण्यात चांगली प्रगती केली असली, तरीही उत्तर भारतातील बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड अशा राज्यांमध्ये हा दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे. हे राज्य अजूनही मागेच आहेत.
उपाययोजना व पुढील वाटचाल
- महिलांसाठी स्वतंत्र व सुरक्षित शिक्षण सुविधा निर्माण करणे
- ग्रामीण भागात डिजिटल साक्षरता व वयस्क महिला साक्षरता कार्यक्रम राबवणे
- अंगणवाडी कार्यकर्त्या, महिला मंडळे यांचा सहभाग घेऊन जनजागृती करणे
- ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ आणि ‘नई शिक्षा नीति’ यासारख्या योजनांना महिला केंद्रित करणे आवश्यक आहे
अहवालातील काय आहेत निष्कर्ष
महिलांमध्ये साक्षरता वाढत असली तरी लिंगदरी अजूनही मोठी आहे. ग्रामीण भागात महिलांचे शिक्षण हे सर्वाधिक दुर्लक्षित आहे. केवळ आकडेवारी वाढवण्याऐवजी सर्वसमावेशक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा प्रसार करणे आवश्यक आहे. साक्षरता वाढवणे हे केवळ एक सामाजिक दायित्व नसून, देशाच्या विकासासाठीही अनिवार्य आहे.