कर्जमाफीचा सरकारने ठोस निर्णय घेतला नाही तर १६ जूनपासून पाण्यात्याग आंदोलन – बच्चू कडू यांचा इशारा
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळी मागील सात दिवसांपासून उपोषण सुरु
अमरावती : कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारकडून ठोस निर्णय घेतला जात नसल्याने बच्चू कडू यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. सरकारने यासंदर्भात निर्णय न घेतल्यास येत्या १६ जूनपासून पाणी त्याग आंदोलन सुरु करण्यात येईल, असा इशारा बच्चू कडू यांनी दिल आहे. (bachchu kadu karjamafi andolan pani tyag 16-june 2025)
शेतकरी कर्जमाफी आणि दिव्यांगांच्या मानधनासंदर्भातील मागण्या मान्य करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु असल्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आश्वासन दिले आहे. सरकारने ३० जून रोजी होणाऱ्या अधिवेशनात याबाबत निर्णय घेण्याचे सांगितले असून, यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन थांबवले जाणार नाही, असे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.
कडू यांचे मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळी मागील सात दिवसांपासून उपोषण सुरु आहे. यावेळी पालकमंत्री बावनकुळे यांनी भेट घेऊन कर्जमाफी संदर्भात आश्वासन दिले व उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र बच्चू कडू यांनी कोणताही निर्णय होईपर्यंत माघार न घेण्याची भूमिका कायम ठेवली आहे. (bachchu kadu karjamafi andolan pani tyag 16-june 2025)
नांदेडकरांसाठी आनंदाची बातमी : वंदे भारत एक्सप्रेस थेट नांदेड ते मुंबई धावणार !
आतापर्यंत ५० ते ६० आमदारांनी बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. काँग्रेस, शरद पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिंदे गटाचे काही आमदार, मनोज जरांगे पाटील आणि राजू शेट्टी यांचाही पाठिंबा मिळाल्याचे कडू यांनी सांगितले. पुढील रणनीतीबाबत ते कार्यकर्ते व समर्थक नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेणार आहेत. कर्जमाफीबाबत तोडगा निघेपर्यंत आंदोलन थांबवणार नाही आणि सरकारने सकारात्मक निर्णय घेतला नाही तर पुढील टोकाची भूमिका घेऊ, असा स्पष्ट इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. (bachchu kadu karjamafi andolan pani tyag 16-june 2025)