“जाचक जीएसटीतून मुक्तता करण्याचे श्रेय राहुल गांधींनाच” – माजी आमदार मोहन जोशी
पुणे : जातीय जनगणनेची मागणी असो, नोटाबंदीचा मुद्दा असो, एच-१ बी व्हिसाचा प्रश्न असो किंवा जीएसटीचा जाच प्रत्येक वेळी सरकारला धारेवर धरत जनतेचा आवाज बनण्याचे कार्य काँग्रेस नेते राहुल गांधींनी केले आहे, असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि माजी आमदार मोहनदादा जोशी यांनी व्यक्त केले.
२०१७ पासून राहुल गांधींनी सातत्याने जीएसटीविषयी जनतेच्या समस्या मांडल्या. कोट्यवधी रुपयांच्या लुटीबद्दल आवाज उठवला. त्यांच्या या संघर्षामुळेच आज जनतेला दिलासा मिळाल्याचे जोशी यांनी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र साहित्य परिषद चौक, टिळक रोड, पुणे येथे विशेष आभार प्रदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पावसाचा जोर असूनही मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
मोहन जोशी म्हणाले, “जीएसटीत बदल घडवून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचे श्रेय राहुल गांधींनाच द्यावे लागेल. मोदी सरकारने लादलेल्या गब्बर सिंग टॅक्स विरुद्ध राहुल गांधींनी ठामपणे लढा दिला. आज जीएसटीतून मिळालेली मुक्तता ही त्यांच्या सातत्यपूर्ण संघर्षाची देण आहे.”
कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी हातात घेतलेल्या फलकांवर घोषणा लिहिल्या होत्या . “झुकता है नरेंद्र मोदी, जब बोलता है राहुल गांधी”, “गब्बरसिंग टॅक्स हटवल्याबद्दल राहुल गांधींना आभार”, “जीएसटीतून मुक्तता – श्रेय राहुल गांधींना आणि काँग्रेसलाच”, “जातीनिहाय जनगणनेला मंजुरी – राहुल गांधींमुळे”.
कार्यक्रमाला पावसातही कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. त्यामध्ये संजय बालगुडे, सुनील मलके, प्रशांत सुरसे, सौरभ अमराळे, प्रथमेश आबनावे, यशराज पारखी, स्वाती शिंदे, चेतन अगरवाल, आयुब पठाण, सुरेश कांबळे, प्रवीण करपे, शाबीर खान, भोला वांजळे, संकेत गलांडे, हसीना सय्यद, इंद्रजीत केंद्रे, गोरख पळसकर, अश्पाकभाई शेख, अनिकेत सोनावणे, अक्षय कांबळे, विकास सुपनार, मंगेश थोरवे, महेश विचारे, राजेश अल्हाट, महेंद्र चव्हाण, अविनाश राठोड, गणेश उबाळे, बाबा शिरसागर, महेश हराळे, विशाल मलके, अनिल आहेर यांचा समावेश होता.
मोदी सरकारवर टीका
मोदी सरकारने जीएसटी लागू करताना पाच स्लॅब लागू केले. त्यावेळी राहुल गांधींनी त्याला “गब्बर सिंग टॅक्स” असे संबोधून तीव्र टीका केली होती. काँग्रेसने सुचविलेल्या मूळ जीएसटीमध्ये फक्त दोनच स्लॅब आणि जीवनावश्यक वस्तूंना करमुक्ती होती. मात्र केंद्र सरकारने मनमानी करून जाचक कर प्रणाली लागू केली आणि आठ वर्षे जनतेची लूट केली, असा आरोप मोहन जोशी यांनी केला.