नांदेड (दि. 18 सप्टेंबर) – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त (17 सप्टेंबर) ते महात्मा गांधी जयंतीपर्यंत (2 ऑक्टोबर) राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता पंधरवडा मोहिमेच्या अनुषंगाने पावडेवाडी (बु.) येथे ग्रामीण स्वच्छता अभियान पार पडले. हा उपक्रम कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून श्री गुरुगोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदेड यांच्या वतीने आयोजित करण्यात आला.
इंग्रज गेले पण शिक्षण पद्धती ठेवून गेले ; नवीन शिक्षण पद्धतीने नवी पिढी घडेल – हरिभाऊ बागडे
या अभियानात ग्रामपंचायत सदस्य, महसूल अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, गावकरी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे (NSS) अधिकारी व स्वयंसेवक, संस्थेतील प्राध्यापक व 150 पेक्षा अधिक प्रशिक्षणार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी गावातील रस्ते, शाळा परिसर व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करण्यात आली तसेच ग्रामस्थांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृतीही करण्यात आली.
इंग्रज गेले पण शिक्षण पद्धती ठेवून गेले ; नवीन शिक्षण पद्धतीने नवी पिढी घडेल – हरिभाऊ बागडे
ग्रामपंचायतचे उपसरपंच बंडूभाऊ पावडे यांनी या उपक्रमात सहभागी झालेल्यांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था केली. आयोजकांनी सांगितले की, ग्रामीण भागात स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करणे आणि “स्वच्छ भारत” संकल्पनेला बळकटी देणे हा उपक्रमाचा मुख्य हेतू होता. तसेच पुढील काळातही असे सामाजिक उपक्रम राबवले जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
या अभियानात पावडेवाडी ग्रामपंचायतचे बंडूभाऊ भाऊराव पावडे, उपसरपंच बंडूभाऊ गंगाधरराव पावडे, बाळासाहेब पावडे, नितीन सावते, ग्रामपंचायत अधिकारी संजयकुमार रामोड, महसूल अधिकारी शिवाजी तोतरे, ग्रामपंचायत कर्मचारी, गावकरी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी गावातील रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, शाळा परिसर आदी ठिकाणी स्वच्छता करण्यात आली आणि ग्रामस्थांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृतीही करण्यात आली. ग्रामपंचायतचे उपसरपंच बंडू पावडे यांनी उपस्थितांना दोन वेळेस अल्पोपहाराची व्यवस्था केली.