zilha parishad nivadnuk 2025। अहिल्यानगरमध्ये सर्वाधिक, सिंधुदुर्ग सर्वात कमी जिल्हा परिषद गट ; तुमच्या जिल्ह्यात किती गट वाढले
प्रभार रचना कार्यक्रम जाहिर
मुंबई : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या गटसंख्येची अंतिम आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. या आकडेवारीनुसार अहिल्यानगर जिल्हा सर्वाधिक गटसंख्या असलेला जिल्हा ठरला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात एकूण ७५ गट निश्चित करण्यात आले आहेत. त्यानंतर नाशिकमध्ये ७४, पुण्यात ७३, तर जळगाव आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी ६८ गट निश्चित झाले आहेत. (maharashtra zilha parishad nivadnuk 2025 gatrachana)
नांदेडकरांसाठी आनंदाची बातमी : वंदे भारत एक्सप्रेस थेट नांदेड ते मुंबई धावणार !
दुसऱ्या बाजूला सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजेच केवळ ५० गट आहेत. गडचिरोलीत ५१, तर अकोला, वर्धा, हिंगोली आणि वाशिम जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी ५२ गट निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यभरातील गटांची संख्या मोठ्या प्रमाणावर विभागली गेली आहे. (maharashtra zilha parishad nivadnuk 2025 gatrachana)
2025 ची नवी प्रभाग रचना : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी मोठा निर्णय
गटसंख्येच्या वितरणाचा आढावा घेतला असता, ५० ते ५५ गट असणारे जिल्हे सर्वाधिक म्हणजे १० जिल्हे आहेत. ५६ ते ६० गट असणारे देखील १० जिल्हे आहेत. ६१ ते ६५ गट असणारे ६ जिल्हे, ६६ ते ७० गट असणारे ४ जिल्हे, तर ७१ ते ७५ गट असणारे केवळ ३ जिल्हे आहेत. (zilha parishad nivadnuk 2025)
या गटरचनेचा राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीवर मोठा परिणाम होणार आहे. गटसंख्येनुसार निवडणूक यंत्रणेची तयारी, उमेदवारांची संख्या व प्रचाराचा विस्तार यात बदल होणार आहे. मोठ्या जिल्ह्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया व्यापक आणि खर्चिक असणार आहे, तर लहान जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया तुलनेने सुलभ राहणार आहे.