आठवडाभर पावसाचा महाष्ट्रात मुक्काम ! ; पावसाचा जोर वाढणार
सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांना सतर्कतेचा सल्ला
पुणे : बंगालच्या उपसागरावर २४ सप्टेंबरला एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असून, त्याचा प्रभाव थेट महाराष्ट्रावर २८ सप्टेंबरपर्यंत जाणवेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. या हवामान बदलामुळे राज्यभर पावसाचे प्रमाण वाढणार असून, ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे.या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे मान्सून पुन्हा सक्रिय होणार आहे. त्यामुळे ३० सप्टेंबरपर्यंत तरी महाराष्ट्रातून मान्सून माघार घेणार नाही, असे संकेत हवामान खात्याने दिले आहेत.
H-1B visa fee hike। “ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय: एच-1B व्हिसासाठी तब्बल $1 लाख फी”
हवामानाचा तपशीलवार अंदाज
२२ ते २५ सप्टेंबर : राज्यातील अनेक भागांमध्ये दुपारनंतर वादळी वाऱ्यासह मेघगर्जना आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
२६ सप्टेंबर : विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व व दक्षिणेकडील भागांत पावसाची तीव्रता वाढणार आहे.
२७ सप्टेंबर : विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण व मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढून मुसळधार पाऊस होण्याची शक्यता.
२८ सप्टेंबर : राज्याच्या पश्चिमेकडील भागांत पावसाचा जोर कायम राहील.
मान्सून आणखी काही दिवस सक्रिय
या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे मान्सून पुन्हा सक्रिय होत आहे. त्यामुळे ३० सप्टेंबरपर्यंत तरी महाराष्ट्रातून मान्सून माघार घेणार नाही, असे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.
शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्या सूचना
1. काढणी केलेल्या पिकांचे पावसापासून संरक्षण करावे.
2. पिके व भुसभुशीत धान्य सुरक्षित जागी साठवून ठेवावे.
3. पुढील शेतीकामांचे नियोजन हवामान अंदाज लक्षात घेऊन करावे.
4. जनावरांच्या खाद्य व पाण्याचा योग्य साठा करून ठेवावा.
नागरिकांसाठी आवाहन
या आठवड्यात पावसाचे प्रमाण वाढणार असल्यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा. नाल्याजवळ किंवा नदीकाठावर जाण्याचे टाळावे. हवामान खात्याचे अद्ययावत अंदाज व इशारे लक्षपूर्वक पाळावेत.