...

जीबीएसचा प्रादुर्भाव असलेल्या सहा गावांमध्ये 500 कोटी रुपये खर्चून उभारले जाणार जलशुद्धीकरण केंद्र 

पुणे : गुलयेन बॅरी सिन्ड्रोम (Guillain-Barré syndrome) रोगाचा प्रादुर्भाव आढळून आलेल्या सहा गावांमध्ये शुद्ध केलेल्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी पाचशे कोटी खर्च करून जलशुद्धीकरण केंद्र बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती पालकमंत्री अजित पवार (Guardian Minister Ajit Pawar) यांनी शुक्रवारी दिली. या प्रकल्पासाठी पाचशे काेटी रुपये खर्च अपेक्षित असुन, महापालिका आणि राज्य सरकार त्याचा प्रत्येकी पन्नास टक्के वाटा उचलणार आहे. (Water purification center for villages affected by GBS)