सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुटणार ; उड्डाण पुलाचे काम महिन्यात होणार पूर्ण

पुणे : सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल ते धायरीच्या (Rajaram Bridge to Dhairi) दिशेने जाणाऱ्या सुमारे २१०० मिटर लांबीच्या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. रंगरंगोटी आणि दिशा दर्शक फलक बसविण्याचे काम सुरु आहे. हे काम एक महीन्यात पुर्ण हाेईल, त्यानंतर ताे वाहतुकीसाठी खुला केला आहे. यासंदर्भात महापािलकेच्या  प्रकल्प विभागाचे प्रमुख युवराज देशमुख (Yuvraj Deshmukh, Head of Project Department, Pune Municipal Corporation) म्हणाले, ‘‘ या उड्डाणपुलाचे उद्‍घाटन एप्रिल किंवा मे मध्ये होऊ शकते.  यापुलाचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून, पथदिवे लावणे, रंगरंगोटी करणे आणि दिशा दर्शक फलक बसविण्याचे काम सुरु आहे.’’ (Traffic congestion on Sinhagad Road will be resolved)