सरकार घाशिराम कोतवाल चालवत आहेत का ? : हर्षवर्धन सपकाळ
पुणे : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या कारभाराची तुलना औरंगजेबाशी केलेल्या वक्तव्यावर मी ठाम आहे, असे स्पष्ट करत आता काँग्रसेच प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Congress state president Harshvardhan Sapkal) यांनी फडणवीस सरकारच्या कामकाजाची तुलना तुघलकांशी केली आहे. तसेच राज्यातील कायदा आणि सुव्यस्थेची परिस्थिती पाहता सरकार घाशिराम कोतवाल चालवत आहेत का ? अशी टीका करत सरकारचे विकेंद्रीकरण करून महाराष्ट्राल स्वतंत्र गृहमंत्री द्यावा, अशी मागणी केली आहे. (CM Fadnavis compares Tughlaq to Aurangzeb) काँग्रेसच्या प्रदेशाध्यपद स्विकारल्यानंतर सपकाळ प्रथमच पुण्यात आले असून काँग्रेसभवन येथे पदाधिकारी, कार्यकर्ता मार्गदर्शन मेळावा घेतला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (CM Fadnavis’ work compared to Tughlaq after Aurangzeb)
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed